Ads
Exclusive

वसई-विरार वासीयांवर पाणी संकट

suryaa dam
जलशुद्धीकरण केंद्र
डेस्क desk team

वसई-विरार वासीयांना पावसाने झोडपले असतानाच आता त्यांच्यावर आणखी संकट उभ ठाकणार आहे. शहराला पाणी पूरवठा करणारे जलशुद्धीकरण केंद्रच बंद पडले आहे. त्यामुळे नागरिकांसमोर पाणी संकट निर्माण होणार आहे.

पालघर जिल्ह्यात काल सकाळपासूनच पावसाने धुमाकूळ घातलाय. यामुळे पूरपरिस्थिती निर्माण झालीय. या पुराचा फटका आता वसई विरार शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या प्रमुख जलशुद्धीकरण केंद्राला बसला आहे.सूर्या धरणाच्या मासवण पंपिंग स्टेशन आणि धुकटन फिल्टर प्लांटला पुराच्या पाण्याने वेढा दिल्याने पंपिंग स्टेशन पूर्ण पणे बंद पडले आहे. तसेच  म रा वि म(MSEB) च्या मासवण येथील सबस्टेशन मध्ये झालेला बिघाड ही दुरुस्ती करण्यात अडचणीत येत आहेत. त्यामुळे शहराचा पाणी पुरवठा खंडित झाला आहे.

दरम्यान हे केंद्र दुरुस्ती करण्याचे वसई-विरार महापालिकेचे शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र या केंद्राला दुरुस्त व्हायला किती वेळ लागेल याची काही शाश्वती नाही आहे. त्यामुळे हे केंद्र लवकरच दुरुस्त न झाल्यास संपूर्ण वसई विरारचा पाणी पुरवठा अनिश्चित काळासाठी बंद पडेल. याचा 25 लाखाहुन अधिक नागरीकांना फटका बसणार आहे. त्यामुळे वसई-विरार वासीयांवर एन पावसाळ्यात पाणी संकट ओढवणार आहे.

 सूर्या धरणाच्या मासवण पंपिंग स्टेशन आणि धुकटन फिल्टर प्लांट येथे  पुराचे पाणी गेल्याने हे  प्लांट ही पूर्ण पणे बंद आहे. त्यामुळे शहरात होणारा पाणी पुरवठा पूर्ण पणे बंद आहे . पाणीपुरवठा सुरू करण्याचे युध्दपातळीवर प्रयत्न सुरू आहेत . पाणीपुरवठा सुरू झाल्यानंतर होणारा पाणीपुरवठा हा अनियमित व कमी दाबाने होणार आहे . तरी नागरीकांनी महापालिकेस सहकार्य करावे ही विनंती .

– वि.वि.एम.सी पाणी पुरवठा विभाग

 

About the author

desk team

www. batamidar.com हे स्वतंत्र पत्रकारितेचा पुरस्कार करते. सध्या माध्यमांची दशा आणि दिशा पाहता पत्रकारितेच्या सापेक्ष आणि पारदर्शक मुल्यांवर आम्ही काम करत आहोत. batamidar.com समाजातील दुर्लक्षित , पिडीत ,उपेक्षित घटकांसाठी व्यासपीठ देण्यासाठी प्रयत्न करत आहे. आजच्या Online च्या युगात, वाढते तंत्रज्ञान आणि पत्रकारिता यांची सांगड घालत बातमीदारीचे नवे आयाम तयार करून बातम्यांची फेरमांडणी म्हणजे बातमीदार...

Leave a Comment

Message Us on WhatsApp
%d bloggers like this: