Ads
बातम्या

यंदा दहावीच्या निकालाचा टक्का घसरला

डेस्क desk team

दहावी बोर्डाचा आज निकाल जाहीर झाला असून निकालाची प्रतिक्षा संपली आहे. यंदा कोकण विभागाने 88.38 टक्क्यांनी बाजी मारली तर नागपूरचा सर्वात कमी निकाल लागला आहे. यंदा दहावीच्या परिक्षेसाठी एकूण 16 लाख विद्यार्थी परिक्षेला बसले होते. ज्यापैकी १२ लाख विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.


हेही वाचादहावीच्या निकालात मुलींनी मारली बाजी


 

 

मार्च २०१९ च्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेसाठी एकूण १६ लाख ३९ हजार ८६२ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. ज्यापैकी १६ लाख १८ हजार ६०२ विद्यार्थी प्रविष्ट झाले. त्यामध्ये विद्यार्थिनींची संख्या ७ लाख ४८ हजार ७१५ आणि विद्यार्थ्यांची संख्या ८ लाख ७० हजार ८८७ होती. या सगळ्यांपैकी एकूण १२ लाख ४७ हजार ९०३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.


हेही वाचाSSC Result 2019 : असा पाहा दहावीचा निकाल


राज्याचा दहावीचा निकाल ७७.१० टक्के लागला. निकाल तब्बल १२ टक्क्यांनी कमालीचा घसरला आहे. यंदाचा अभ्यासक्रम आणि परीक्षा पद्धतीत बदल झाल्यानंतची ही पहिलीच परीक्षा होती. त्यामुळे विद्यार्थांच्या गुणामध्ये घट झाली असल्याचे माहिती शिक्षण मंडळाच्या अध्यक्षा डॉ. शकुंतला काळे यांनी दिली.

About the author

desk team

www. batamidar.com हे स्वतंत्र पत्रकारितेचा पुरस्कार करते. सध्या माध्यमांची दशा आणि दिशा पाहता पत्रकारितेच्या सापेक्ष आणि पारदर्शक मुल्यांवर आम्ही काम करत आहोत. batamidar.com समाजातील दुर्लक्षित , पिडीत ,उपेक्षित घटकांसाठी व्यासपीठ देण्यासाठी प्रयत्न करत आहे. आजच्या Online च्या युगात, वाढते तंत्रज्ञान आणि पत्रकारिता यांची सांगड घालत बातमीदारीचे नवे आयाम तयार करून बातम्यांची फेरमांडणी म्हणजे बातमीदार...

Leave a Comment

Message Us on WhatsApp
%d bloggers like this: