Ads
राजकीय घडामोडी

महापालिकेच्या भ्रष्टकारभाराविरोधात प्रहारची निदर्शने

वसई-विरार महानगरपालिकेच्या बांधकाम विभागाच्या भ्रष्ट कारभाराविरोधात आज प्रहार जनशक्ती पक्षाने आंदोलन पुकारले होते. यावेळी महापालिकेवर गंभीर आरोप करत बांधकाम विभागाकडून सुरू असलेला भ्रष्ट्राचार थांबलाच पाहिजे असे प्रहार जनशक्ती पक्षाचे पालघर जिल्हा अध्यक्ष हितेश जाधव यांनी सांगितले. यासंबधित प्रकरणाची चौकशी होण्यासाठी निवेदनही त्यांनी पालिकेकडे सुपूर्द केले.

प्रहार जनशक्ती पक्षाचे पालघर जिल्हा अध्यक्ष हितेश जाधव यांच्या नेतृत्वाखाली आज दुपारी 1 वाजताच्या सुमारास महापालिकेच्या मुख्य कार्यालयाच्या प्रवेश द्वारावर आंदोलन करण्यात आले. यावेळी हितेश जाधव म्हणाले की, वसई-विरार शहरात कित्येक वर्षापासून बांधकाम विभागाचा भ्रष्ट्राचार सुरु आहे. रस्ते, गटार याबबत निविदा निघण्याआधीच पैसे निघतात. तसेच कामामध्येहि मोठी तफावत जाणवत असल्याचा गंभीर आरोप केला आहे. तसेच जो व्यक्ती टेंडर काढतो त्या व्यक्तीला सोडून चौथ्या व्यक्तीला टेंडर मिळत असल्याचेही त्यांनी सांगितले.

शहरात कुठलेही होत असेल तर निविदा निघाल्यावर ज्या ठिकाणी काम केले जाते तेथे फलक लावणे बंधनकारक असते. मात्र अनेक प्रकरणात बांधकाम विभागाकडून फलक लावलेच जात नाही. यामागे मोठा भ्रष्टाचार आहे. तसेच सत्ताधारी व पालिका अधिकाऱ्याच्या संगनमताने हा प्रकार होत असल्याचे हितेश जाधव यांनी सांगितले.

About the author

desk team

www. batamidar.com हे स्वतंत्र पत्रकारितेचा पुरस्कार करते. सध्या माध्यमांची दशा आणि दिशा पाहता पत्रकारितेच्या सापेक्ष आणि पारदर्शक मुल्यांवर आम्ही काम करत आहोत. batamidar.com समाजातील दुर्लक्षित , पिडीत ,उपेक्षित घटकांसाठी व्यासपीठ देण्यासाठी प्रयत्न करत आहे. आजच्या Online च्या युगात, वाढते तंत्रज्ञान आणि पत्रकारिता यांची सांगड घालत बातमीदारीचे नवे आयाम तयार करून बातम्यांची फेरमांडणी म्हणजे बातमीदार...

Leave a Comment

Message Us on WhatsApp
%d bloggers like this: