वर्धा जिल्ह्याच्या हिंगणघाटमध्ये एकतर्फी प्रेमातून एका शिक्षिकेला पेट्रोल टाकून जाळण्यात आले होते. या घटनेत ती 40 टक्के भाजली होती. दरम्यान गेल्या सात दिवसांपासून पीडिता मृयुशी झुंज देत होते. मात्र आज अखेर पहाटेच्या सुमारास तिचा मृत्यू झाला. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला असून राजकीय नेत्यांपासून कलाविश्वात संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.
3 फेब्रुवारी रोजी एकतर्फी प्रेमातून विकेश नगराळे या तरुणाने प्राध्यापिकेवर पेट्रोल टाकून तिला जाळण्याचा प्रयत्न केला होता. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या तरुणीची मृत्यूशी सुरु असणारी झुंज आज सकाळी सहा वाजून ५५ मिनिटांनी संपली. ऑरेंज सिटी रुग्णालयात या तरुणीने अखेरचा श्वास घेतला. पीडितेचे पार्थिव शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहे. दुपारनंतर पीडितेच्या मूळ गावी म्हणजेच दारोडा येथे अत्यंविधी केले जाणार असल्याचे सांगितले जात आहे.
मुलीच्या या मृत्युनंतर बापाच्या हि अश्रूंचा बांध फुटला. माझ्या मुलीला त्वरीत न्याय द्या. निर्भयासारखा न्यायाला उशीर करू नका. त्या नराधमाला आमच्यासमोर आणा. आमच्या स्वाधीन करा. त्याचं काय करायचं ते आम्ही पाहू, असा आक्रोश या पीडितेच्या वडिलांनी केला.
हिंगणघाट येथील पीडितेची मृत्यूशी झुंज अखेर अपयशी ठरली आहे. दिवसाची सुरुवात या दुर्दैवी बातमीने होत आहे याचं दुःख वाटतं. भावपूर्ण श्रद्धांजली!
— Jayant Patil (@Jayant_R_Patil) February 10, 2020
सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी लक्षात ठेवा, क्रूरतेला महाराष्ट्रात थारा नाही असा सज्जड दम अत्याचार करणाऱ्या प्रवृत्तीला ट्विटरवरून दिला आहे.
हिंगणघाट जळतकांडातील पीडितेची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली हे अत्यंत दुर्दैवी आहे.क्रूरतेला महाराष्ट्रात थारा नाही हे लक्षात ठेवावे. पीडितेला लवकरात लवकर न्याय मिळावा यासाठी सरकार कटिबद्ध आहे. या पुरोगामी महाराष्ट्रात समाज म्हणून आपण कुठे चाललो आहोत याचा गांभीर्याने विचार करायला हवा.
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) February 10, 2020
माझ्यातली आई आज सुन्न, नि:शब्द झालीय… महाराष्ट्राच्या लेकीचा जीवनाशी संघर्ष संपला, आपण या ‘हिंसक-पुरुषी’ मानसिकतेशी संघर्ष सुरू करूया #हिंगणघाट
— Adv. Yashomati Thakur (@AdvYashomatiINC) February 10, 2020
मुलीच्या मृत्यू प्रकरणाची सुनावणी फास्टट्रॅक कोर्टात होतेय.पिडितेला न्याय मिळवून देण्यासाठी सरकारने ठोस पावले उचलावीत.या मुलीला भावपूर्ण श्रद्धांजली असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.
अतिशय दुःखद..! अखेर हिंगणघाट प्रकरणातील युवतीचा मृत्यु झाला.या प्रकरणाची सुनावणी फास्टट्रॅक कोर्टात होतेय.पिडितेला न्याय मिळवून देण्यासाठी सरकारने ठोस पावले उचलावी ही विनंती.या मुलीला भावपूर्ण श्रद्धांजली.तिच्या कुटुंबीयांवर कोसळलेल्या दुःखात आम्ही सर्वजण सहभागी आहोत.
— Supriya Sule (@supriya_sule) February 10, 2020
#हिंगणघाट निर्भयाला भावपुर्ण श्रद्धांजली,तू जळाली नाहीस तर समाजाचा व व्यवस्थेचा बुरखा जळाला 🙏 pic.twitter.com/TxeqilbgXc
— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) February 10, 2020
हिंगणघाट मधील पीडित मुलीला वाचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले गेले, पण ती वाचू शकली नाही, याचं आम्हाला दुःख आहे. तिच्या कुटुंबियांच्या पाठीशी राज्य सरकार आहे. पीडित मुलीच्या घरातील एकाला शासकीय नोकरी व इतर सर्व सहाय्य केले जाईल. pic.twitter.com/n0ZS3wSVfH
— ANIL DESHMUKH (@AnilDeshmukhNCP) February 10, 2020
हिंगणघाट येथील पीडितेची मृत्यूशी झुंज अखेर अपयशी ठरली आहे. दिवसाची सुरुवात या दुर्दैवी बातमीने होत आहे याचं दुःख वाटतं. भावपूर्ण श्रद्धांजली!