वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या टी-२० मॅचमध्ये भारताचा ६ विकेटने दणदणीत विजय झाला. या विजयासह भारताचा कर्णधार विराट कोहली याने सर्वाधिक वेळा मॅन ऑफ द मॅच मिळवण्याचा विक्रम आपल्या नावे केला आहे.
विराटने ९४ रनची खेळी केली. टी-२० क्रिकेटमधला हा सर्वाधिक स्कोअर आहे. विराटचं टी-२० क्रिकेटमधलं हे २३वं अर्धशतक होतं. या कामगिरीबद्दल विराटला मॅन ऑफ द मॅच देऊन गौरवण्यात आलं.दरम्यान टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा मॅन ऑफ द मॅच मिळवण्याचा विक्रम विराटच्या नावावर झाला आहे. विराटने १२व्यांदा टी-२० क्रिकेटमध्ये मॅन ऑफ द मॅच किताब मिळवला. अफगाणिस्तानच्या मोहम्मद नबीनेही टी-२० क्रिकेटमध्ये १२वेळा मॅन ऑफ द मॅच पटकावलं आहे.
वेस्ट इंडिजने ठेवलेल्या २०८ रनच्या आव्हानाचा पाठलाग भारताने १८.४ ओव्हरमध्ये ४ विकेट गमावून केला. कर्णधार विराट कोहलीने नाबाद ९४ रनची तर केएल राहुलने ६२ रनची खेळी केली. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात आता रविवारी दुसरी टी-२० मॅच खेळवण्यात येणार आहे. या मॅचमध्ये मोहम्मद नबीच्या पुढे जायची संधी विराटला आहे.