Ads
स्पोर्टस

कसोटी क्रिकेटमधील कर्णधार विराट कोहलीचे अनोखं अर्धशतक

virat kohali
डेस्क desk team

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमध्ये आपलं अनोखं अर्धशतक साजरं केलं आहे. मात्र हे अर्धशतक फलंदाज म्हणून नसून कर्णधार या नात्याने झळकावलं आहे. विशाखापट्टणम कसोटीत विराट कोहलीच्या भारतीय संघाने आफ्रिकेवर 203 धावांनी मात केली.

पुण्यात खेळवल्या जाणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यात विराट नाणेफेकीसाठी मैदानात उतरला, नाणेफेक जिंकत विराटने या कसोटी सामन्यातही फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. कर्णधार या नात्याने विराट कोहलीचा हा 50 वा कसोटी सामना ठरला आहे. या यादीत विराटने माजी कर्णधार सौरव गांगुलीला मागे टाकलं आहे.

कसोटीमध्ये सर्वाधिक सामन्यांमध्ये भारताचे नेतृत्व करणारे कर्णधार 

  • महेंद्रसिंह धोनी – 60
  • विराट कोहली – 50
  • सौरव गांगुली – 49
  • सुनिल गावसकर/मोहम्मद अझरुद्दीन – 47
  • मन्सूर अली खान पतौडी – 40

यावेळी नाणेफेकीदरम्यान विराट कोहलीने आपल्याला भारतीय संघाचं नेतृत्व करायला मिळाल्याबद्दल बीसीसीआय आणि सर्व सहकाऱ्यांचे आभार मानले आहेत. महेंद्रसिंह धोनीनंतर भारतीय संघाचे 50 कसोटी सामन्यांमध्ये नेतृत्व करणारा विराट हा दुसरा कर्णधार ठरला आहे.

About the author

desk team

www. batamidar.com हे स्वतंत्र पत्रकारितेचा पुरस्कार करते. सध्या माध्यमांची दशा आणि दिशा पाहता पत्रकारितेच्या सापेक्ष आणि पारदर्शक मुल्यांवर आम्ही काम करत आहोत. batamidar.com समाजातील दुर्लक्षित , पिडीत ,उपेक्षित घटकांसाठी व्यासपीठ देण्यासाठी प्रयत्न करत आहे. आजच्या Online च्या युगात, वाढते तंत्रज्ञान आणि पत्रकारिता यांची सांगड घालत बातमीदारीचे नवे आयाम तयार करून बातम्यांची फेरमांडणी म्हणजे बातमीदार...

Leave a Comment

Message Us on WhatsApp
%d bloggers like this: